समाजसेवेचा प्रवास हा पदावर अवलंबुन नसतो, परंतु इच्छाशक्तीस शक्तीची जोड यशासाठी अनिवार्य असते. अनेक वर्षे जनतेसोबत जोडले गेल्यामुळे जनसामान्यांच्या समस्यांची जाण आहे आणि लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्थेचा अध्यक्ष, सक्रिय राजकारणी आणि समाजसेवक या भूमिकेतुन समस्या निराकरणाचे ज्ञान आहे.
ज्याला गरज पडेल त्यांना शक्य असेल ती सर्वतोपरी मदत करणे या सूत्रावर कार्य करित असताना निम्नोक्त मुद्यांवर विशेष कार्य करण्याचा मानस आहे.
'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' या तत्वाला अनुसरुन खर्या हिंदुत्वाचा प्रसार करणे.
संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या उन्नतीसाठी कार्य करणे.
बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करण्याकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे.
पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्दीष्टाने विविध प्रकल्प राबविणे.
प्लॅस्टिक बंदी झाली असली तरी अद्याप प्लॅस्टिक मुक्ती साध्य झालेली नाही, त्या दृष्टीने समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेणे.
गरीब, गरजु कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवुन देणे.
मुंबईत शाश्वत लोकोपयोगी विकासकामे जनतेच्या मागण्यानुरुप व सुचनांनुसार साकारणे.